नांदगाव : मारुती जगधने
शुक्रवार दि १५ रोजी रात्री ८:३० वाजे पासून नांदगाव शहरातील रहदारी सुमारे दिड किमी पर्यंत
ठप्प झाली होती. अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी होत असून या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या. पोलीस स्टेशन हुतात्मा चौक ते न्यु इंग्लीश स्कुल दरम्यान लागणारी तथा पार्किंग केलेली वाहने या कारणास्तव वाहतूक कोंडी होत असते.
सध्या नांदगाव, संभाजीनगर व येवला मार्गे, ४० गांव, या भागात ये जा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. २४ तासात १० हजार वाहने या मार्गावरून धावत असतात त्यात ७०% वाहने आवजड वाहने आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते .
दरम्यान नांदगाव पोलिसांनी उशिरा पर्यंत शहरतील शाकंबरी पुल ते नांदगाव काॅलेज पर्यंत ची ठप्प झालेली रहदारी सुरळीत करण्याचे काम चालू होते. सुमारे दिड किमी पर्यंत ची रहदारी राञी ठप्प झाली होती. मालेगाव, नांदगांव, येवला,मार्गे शिर्डी ,अ नगर, पुणे,बंगलोर या भागात ही वाहतूक चालत असते.












