loader image
[ays_poll id=7]

कॅम्प परिसरात पोलिस छावणी व रात्री पोलीस गस्त वाढवावी – माधव शेलार

Dec 23, 2023


मनमाड – काही दिवसांपूर्वी मनमाड पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग जोडणारा मनमाड शहरातील एक

मात्र रेल्वे ओव्हर ब्रिज अचानक कोसळला, रेल्वे ओव्हर ब्रिज दुरुस्त करून वाहतूक पूर्वरत सुरु करण्यास एक ते दोन महीण्याचे कालावधी लागणार आहे, तरी या भागात राहणारे नागरिक पर्याय नसल्याने आपली दुचाकी, चारचाकी वाहने पुलाच्या बाजूने पार्क करतात तरी मागील दिवसात काही वाहने चोरी गेल्याच्या घटना घडत आहे तसेच जो पर्यायी मार्ग संबंधित विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे तो खूप लांबचा रस्ता असून रात्रीच्या वेळी सुरक्षित नाही त्या रस्त्यावर देखील लुटमारीच्या घटना घडत आहे तरी यावर लवकरात लवकर आपल्या पोलिस ठाणे मार्फत योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी शेलार यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे.
मनमाड पोलीस ठाणे अंतर्गत येणारे कैम्प, रमाबाई नगर, भारत नगर आनंदवाडी, गोदावरी, सुभाष नगर, नजराना, हबीब नगर, दावत नगर, 28 युनिट, शकुंतला नगर, आयोध्या नगर, बाप्पु नगर, महानंदा नगर, शांती नगर, श्रावस्ती नगर रेल्वे फिल्टर, हाऊस रेल्वे कॉलनी, नगर चौकी, सोबत वांजरवाडी, करी, एकवई, लोहशिंगवं, भालूर, मालेगाव कर्यात, अंकाई तांडा, अनकवाडे, या ग्रामीण भागातील गावांचा, सुमारे 35 ते 40 हजार लोकसंख्येचा मनमाड शहराशी संपर्क तुटलेला आहे, तरी या भागात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूल दुरुस्त होई पर्यंत पुलाच्या कडेला येवला रोडच्या दिशेने तात्पुरत्या स्वरुपात एक पोलीस छावणी व वरील भागात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त सुरू करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख उ बा ठा गट माधव शेलार यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.