loader image
[ays_poll id=7]

चारा पाण्याच्या शोधात हरीण ठार हरणांच्या मृत्यूचा सिलसिला सुरूच !

Dec 26, 2023




नांदगाव : मारुती जगधने
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द शिवारात हरीण काळवीट, मोर,लांडगे,कोल्हे ससे,रानमांजर, यांचे प्रामण अधिक असल्याने तालुक्यात पाणी टंचाईमुळे हे वन्यप्राणी चारा,पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असतात असेच एक काळवीट चारा पाण्याच्या शोधात हिसवळ खुर्द शिवारात नांदगाव मनमाड रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले .गत दोन तिन महिण्यात अपघाताने व हल्ल्यात सुमारे १५ हरीण मरण पावले आहे .
नांदगाव तालुक्यात हरीण काळवीट यांचा अपघाताचा शिलशिला चालूच आहे या होणारया अपघातामुळे हरणांची संख्या घटत चालली आहे .तालुक्यातील दुष्काळी परिस्थितमुळे तालुक्यात वन्यजिवाना चारा व पाणी यासाठी मानवीवस्तीकडे भटकंती करावी लागत असल्याने या दरम्यान जळगांव बु येथे चारा पाण्याच्या शोधातील १० हरणावर मोकाट कुञ्यांनी हल्ला केल्याने यावेळी १० हरीण विहीरीत पडले त्यातील ४ हरीण मृत झाले होते त्या नंतर नांदगांव श्रीरामनगर हद्दीत एक हरीण अपघातात ठार झाले त्यानंतरही चांदोरा येथे एक हरीण मृत झाले आणी दि २६ रोजी नांदगाव मनमाड रोडवर हिसवळ खुर्द हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेने एक हरीण ठार झाले. गत तिन महिण्यात १५ हरणांचा अपघात व घातपाताने मृत्यु झाला आहे .हिसवळ खुर्द अपघात समयी या वेळी ज्ञानेश्वर जगधने, व टँकर चालक वडगे यांनी घटनेची माहिती पत्रकारांना दिली व वनविभागाला कळविले असता सदर हरीण वनविभागाने ताब्यात घेऊन ,त्याचे दहण केले. हरणांच्या आपघाताची संख्या दिवसेदिवस वाढत आहे . ही बाब चिंताजनक आहे .


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.