सुमारे दोन दशकांपासून मनमाड शहर आणि परिसरातील ग्राहकांसाठी सोने,चांदीच्या दागिन्यांच्या विविध व्हाराईटीज उपलब्ध करत ग्राहकांचे मन जिंकणाऱ्या श्री गणेश ज्वेलर्स या नवीन आणि सुसज्ज दालनाचे उद्घाटन बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री.सुनील शेठ भंडारी तसेच सौ पवनबाई भंडारी यांच्या शुभहस्ते येथील सराफ बाजार येथे होणार आहे. या दालनाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख आकर्षण सुख म्हणजे काय असते या मालिकेतील अभिनेत्री गौरी अर्थात गिरिजा प्रभु ह्या उपस्थित राहणार आहे. ह्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार, नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, मनमाड श्री संघाचे संघपती रिखबचंद ललवाणी, मनमाड श्री संघाचे अध्यक्ष पोपटलाल सुराणा हे उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक निर्मल भंडारी, गणेश ज्वेलर्सचे संचालक ललित भंडारी तसेच जयेश भंडारी यांनी केले आहे.
मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनीची वनरक्षक पदी नियुक्ती
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य( स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड...











