loader image
[ays_poll id=7]

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

Jan 15, 2024




आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या मुलांसाठी 2 वसतिगृह मंजूर झाले आहेत.
समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, दरवर्षी ऊसतोड हंगामामध्ये ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत ऊसतोड कामगार स्थलांतरित होत असतात. स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड कामगारांसोबत त्याची मुलेही स्थलांतरित होत असल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. त्यामुळे या विभागातील मुलांच्या शाळेतील गळतीचे प्रमाण अधिक असून शिक्षणाच्या अभावी ते बालमजूरीकडे ओढले जातात. ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी “संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यात मुले व मुलींसाठी असे 2 वसतिगृह मंजूर करण्यात आले आहे .
नांदगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने गावात राहत असलेले ऊस तोड कुटुंबीयांची मोठी संख्या आहे, आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुम ताई कांदे सतत या कामगार कुटुंबियांच्या संपर्कात असतात, या मध्ये बंजारा समाज बांधव तसेच आदिवासी बांधव ऊस तोडीस जात असतात. यांच्या करिता अनेक विकास कामे करीत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सतत या वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
ऊस तोड बांधवांचे अथक परिश्रम आणि मेहनतीची जाणीव ठेवत आण्णांनी त्या कुटुंबियांच्या मला मुलींची शिक्षणाची ओढताण ओळखली, त्या ही मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, पण त्यांना सुविधा मिळत नाही ही गरज ओळखूनच 2 वसतिगृह मंजूर करवून घेण्यात आली आहेत.
या वसतिगृहाची सोय झाल्याने ऊस तोड कामगारांच्या मला मुलींना शिक्षण घेता येईल, त्यांचा शिक्षणाकडे कल वाढेल आणि पुढील पिढी शिक्षणामुळे स्वतच्या हिमतीवर स्वतः च भविष्य घडवू शकतील.

वसतिगृह सुरू झाल्यावर जास्तीत जास्त ऊस तोड कामगारांनी आपली मुलं या वस्तीहगृहात टाकावी आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही किंवा मुलं शिक्षणापासून दूर जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.