आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या मुलांसाठी 2 वसतिगृह मंजूर झाले आहेत.
समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, दरवर्षी ऊसतोड हंगामामध्ये ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत ऊसतोड कामगार स्थलांतरित होत असतात. स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड कामगारांसोबत त्याची मुलेही स्थलांतरित होत असल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. त्यामुळे या विभागातील मुलांच्या शाळेतील गळतीचे प्रमाण अधिक असून शिक्षणाच्या अभावी ते बालमजूरीकडे ओढले जातात. ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी “संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यात मुले व मुलींसाठी असे 2 वसतिगृह मंजूर करण्यात आले आहे .
नांदगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने गावात राहत असलेले ऊस तोड कुटुंबीयांची मोठी संख्या आहे, आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुम ताई कांदे सतत या कामगार कुटुंबियांच्या संपर्कात असतात, या मध्ये बंजारा समाज बांधव तसेच आदिवासी बांधव ऊस तोडीस जात असतात. यांच्या करिता अनेक विकास कामे करीत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सतत या वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
ऊस तोड बांधवांचे अथक परिश्रम आणि मेहनतीची जाणीव ठेवत आण्णांनी त्या कुटुंबियांच्या मला मुलींची शिक्षणाची ओढताण ओळखली, त्या ही मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, पण त्यांना सुविधा मिळत नाही ही गरज ओळखूनच 2 वसतिगृह मंजूर करवून घेण्यात आली आहेत.
या वसतिगृहाची सोय झाल्याने ऊस तोड कामगारांच्या मला मुलींना शिक्षण घेता येईल, त्यांचा शिक्षणाकडे कल वाढेल आणि पुढील पिढी शिक्षणामुळे स्वतच्या हिमतीवर स्वतः च भविष्य घडवू शकतील.
वसतिगृह सुरू झाल्यावर जास्तीत जास्त ऊस तोड कामगारांनी आपली मुलं या वस्तीहगृहात टाकावी आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही किंवा मुलं शिक्षणापासून दूर जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज
स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...










