loader image

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

Jan 17, 2024




प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन योजनेअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अतिदुर्गम भागातील आदिवासींशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संपर्क संवाद साधून आदिवासींना मिळालेल्या विविध योजनांच्या लाभांची माहिती घेतली या अभियाना अंतर्गत आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कवनाई येथे पिंपरी सदो येथील एकलव्य आदिवासी विद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी भारतीय नारायण रण आणि तिचा भाऊ भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ भारती पवार म्हणाल्या की पीएम जनमन अंतर्गत देशातील अति मागास बावीस हजार पेक्षा जास्त गावात दोन वर्षात लाखों आदिवासी लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे लक्ष असून त्यासाठी 24000 करोड रुपयांचे स्वतंत्र बजेट देण्यात आले आहे त्यामुळे आता प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत या योजना पोहोचविण्याची आपली जबाबदारी आहे.
यावेळी केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी सहकारी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, नाशिक प्रकल्प अधिकारी जतिन रहमान, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, गट विकास अधिकारी सोनी नाखाडे, सुनील बच्छाव,गोरख बोडके, जतीन रहमान ,सुरज कुमार, मेहराज शेख ,गोरख बोडके, सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ अधिकारी यांच्यासह विद्यार्थी व कावनईचे ग्रामस्थ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.