loader image
[ays_poll id=7]

देशाच्या विकासात स्त्रियांचे योगदान हे उल्लेखनीय आहे :- डॉ. भारती पवार

Jan 21, 2024




नांदगाव येथे महिला सबलीकरण सम्मेलन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार व भाजप प्रदेश महामंत्री श्री विजयजी चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
नांदगाव येथील महिला सबलीकरण अंतर्गत महिलांना मार्गदर्शन करताना डॉ भारती पवार यांनी सांगितले की महिलांना सक्षम करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे महिला केंद्रित विकास दृष्टीकोन महत्त्वाचा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारत या दिशेने प्रगती करत आहे.शेती, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रांमध्ये महिला, युवती आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना त्यांना देश, समाज आणि कुटुंबाशी संबंधित निर्णय घेण्यास सक्षम बनवणे. यावेळी शंकरराव वाघ, जयश्रीताई दौंड, संजय सानप,पंकज खाताबळ,निकम महाराज, गणेश शिंदे, राजाभाऊ बनकर, मनिषा काकड, शिवाजी कराडे,सुरेश काळे, जुईताई, मीनाक्षी हिरे,मनीषा पाटील, छाया बोरसे,तारा शर्मा, राजीव धामणे, संदीप पगार,सोमनाथ धोंडगे,रामचंद्र दुकळे,संजय हिरे, अर्जुन शेलार, जावेद शेख सहित मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
.