🇮🇳 *२३ जानेवारी १८९७ कटक, ओडिशा येथे जन्मलेले व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर ने
तृत्व ज्यांना संपूर्ण देश नेताजी नावाने ओळखत. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी जपानच्या मदतीने त्यांनी *”आझाद हिंद सेना”* स्थापन केली. त्यांनी दिलेला *’जय हिंद’* चा नारा हा भारताचा राष्ट्रीय नारा बनला.
*”तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुगा”* असे भावनात्मक आव्हान त्यांनी संपूर्ण भारतीय जनतेला केले होते.
*१९९२ साली त्यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान केला गेला पण एका जनहित याचिके मुळे त्यांच्या मृत्यूचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्या मुळे हा पुरस्कार परत घेण्यात आला. भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची ही इतिहासातील एकमेव घटना आहे.*
*पण नेताजींचे अद्वितीय कार्य या पेक्षाही खूप महान आहे. अशा या अद्वितीय नेत्यास जयंती निमित्त फलक रेखाटनातून त्रिवार अभिवादन !!* 🇮🇳
◼️फलक रेखाटन – देव हिरे.
(कलाशिक्षक ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)
