loader image
[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

Jan 29, 2024


श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थिती राहून शेतकरी बांधवांना संबोधित केले.
तसेच कृषी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेऊन या प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले.यावेळी राज्यातून आलेल्या विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचांना समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आबासाहेब मोरे, दत्ताजी काकडे ,राजाराम पोतनीस, जे डी टेमगिरे, राजमल भागवत, बाळासाहेब धुमाळ,नरेंद्र जाधव, योगेश तिडके, तानाजी गायकर, सुषमाताई देसले, समाधान बोडके ,सदानंद नवले विविध जिल्ह्यातील सरपंच,शेतकरी व नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.