loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत महात्मा गांधी यांना अभिवादन

Jan 31, 2024




मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कुल वं ज्युनियर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिपक व्यवहारे आणि उपस्थित उपप्राचार्य श्री. वैभव कुलकणी, व संस्थेचे विश्वस्त श्री. धनंजय निंभोरकर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दुसरी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. ओम शुक्ला, सार्थक रावतोळे, रागिनी कुशवाह आणि स्नेहा सानप या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींनी केलेले कार्य व इंग्रजांविरूध्द केलेला लढा, आंदोलने तसेच अहिंसावादी धोरण अशा विविध मुद्दयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साई गायकवाड याने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सौ. अनिता शाकाव्दिपी व सौ. ऋचा शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.