loader image
[ays_poll id=7]

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

Feb 7, 2024




मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आले.संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या मंगलदिनी बुधवारी (ता.७) दुपारी १२ ला साजरा होणार आहे. यानिमित्त आंबेडकरी अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने मनमाड शहर निळेमय झाले आहे.

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बसवलेल्या अर्धाकृती पुतळ्याला ५९ वर्ष झाले आहे. मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र राहिल्याने गेल्या ४० वर्षापासून पूर्णाकृती बसविण्यात यावा ही मागणी होत होती. आमदार सुहास कांदे यांनी ही मागणी तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना त्यात यश आले. आमदार कांदे यांच्या प्रयत्नातून शहरातील रेल्वे स्टेशन गेट समोर संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभारण्यात आले आहे.

शहरातील एकात्मता चौकासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात जगविख्यात पुज्य भन्ते डॉ. राहुल बोधी महास्थवीर यांच्या हस्ते आणि आमदार सुहास कांदे,
अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. पुतळा लोकार्पण हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता एकात्मता चौकात होणार आहे. लोकार्पण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.