रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या संदर्भात लोकसभा निवडणुकी जाहीर होण्याची अगोदर सूचना पारित होऊ शकते.
रेल्वेमध्ये प्रवास करताना निर्धारित रकमेपेक्षा जास्त दागिने परिधान केल्यास चौकशी होऊ शकते. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास सुरक्षा दले जप्तीची कारवाई ही करू शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार यासंदर्भात स्पष्ट निर्देश जारी करू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीदरम्यान रोख रक्कम आणि दारू जप्त करण्याबाबत कठोरतेमुळे काही राजकीय पक्ष किंवा उमेदवार दागिन्यांमधून सोन्याची तस्करी करतात. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी
सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण पुरुष प्रवाशांसाठी 100 ग्रॅम, अविवाहित महिलांसाठी 250 ग्रॅम आणि विवाहित महिलांसाठी 500 ग्रॅम निश्चित करण्यात आले आहे. सध्या जादा दागिन्यांसह प्रवास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त दागिने घेऊन रेल्वेने प्रवास करता येणार नाही का? एका रेल्वे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त दागिने घेऊन प्रवास करत असाल तर तुम्हाला त्याचे बिल किंवा स्त्रोत याबाबत समाधानकारक उत्तर द्यावे लागेल. दागिने कुठून आणि कोणत्या उद्देशाने मिळाले हे प्रवाशाला सांगावे लागेल, अन्यथा ते जप्त केले जाईल.












