loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

Feb 16, 2024


मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर होते तर कार्यक्रमाला संस्थेचे जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दहावीच्या परीक्षेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी. यशस्वी होण्यासाठी काय करावे? परीक्षेची भिती कशी दूर करावी? याबाबतचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुकेश मिसर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

या निरोप समारंभात इयत्ता 10 वीच्या आदित्य सोनवणे, भक्ती चौधरी, श्रावणी चव्हाण, सई सोमासे, हेमांगी मुलचंदानी, आकांक्षा कातकडे, सिध्दी सानप या विद्यार्थ्यांनी नर्सरीपासून दहावी पर्यंतच्या आपल्या १३ वर्षाच्या प्रवासाचे अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले. विद्यार्थ्यांनिनी ग्रुप डान्स सादर केला.

या निरोप समारंभाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु. नुतन पगारे व कु. सान्वी मिश्रा या विदयार्थिंनींनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.