loader image

के आर टी शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी

Feb 27, 2024


के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. “ने मजसी ने परत मातृभूमी ला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा” कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पहिली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेले होते. इयत्ता पहिली स्वरा मुंगीकर. यश संसारे. इयत्ता सहावीची अंतरा कोठावदे. देवांश गंगेले. राधिका बोडके. या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आपले मत प्रकट केले. 26 मे 1883 रोजी नाशिक जवळील भगूर या गावात झाला त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची वाचनाची ओढ होती. त्या काळात भारत ब्रिटिशांची जुलमी राजवटीखाली भरडला जात होता. सावरकर हे सर्व जवळून पाहत होते लहान वयातच देशभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात पेटली होती.मारता मारता मरेल पण इंग्रज विरुद्ध लढेन अशी प्रतिज्ञाच त्यांनी लहानपणापासून घेतली होती. त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालून परदेशी कपड्यांची होळी केली होती. त्यांनी पुण्यात अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संस्था स्थापन केली. पुढे बॅरिस्टर होण्यासाठी ते परदेशात गेले. तेथे त्यांनी फ्री इंडिया सोसायटी नावाची संघटना स्थापन केली. त्यानंतर लंडनमध्ये त्यांना अटक झाली. कैद होणे हे सावरकरांना आवडले नाही. त्यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी भर समुद्रात उडी मारली पोहत पोहत ते माँर्सेलीस बंदरावर पोहोचले पण दुर्दैवाने त्यांना पकडण्यात इंग्रजांना यश आले ब्रिटिश सरकारने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांची खाजगी अंदमानच्या तुरुंगात करण्यात आली. तेथे सावरकर अक्षरशः नरक यातना भोगत होते. तुरुंगात झालेल्या छळ आणि देशासाठी अथक कष्टामुळे त्यांची प्रकृती खालावली या भारत मातेच्या महान सुपुत्रास त्रिवार अभिवादन कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .उपप्राचार्य वैभव कुलकर्णी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना सौ. राजश्री बनकर विलास कैचे. यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गार्गी संधानाशिव. लाडली सिंग यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.