loader image
[ays_poll id=7]

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

Feb 27, 2024


मनमाड – नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी व्यवसाय व इतर व्यवसाय हे ठप्प पडलेले आहेत. व्यापारी व नागरीक या दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदील झालेले आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात पैश्याची अत्यंत चणचण आहे. अशा परिस्थितीत मार्च एन्ड सुरु होणार असुन सदर काळात शासकीय वसुली होणे बंधनकारक असते. तरी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांकडे सद्यस्थिती जेवढे पैसे आहेत तेवढे भरुन घ्यावे व इतर उर्वरीत पैश्यांसाठी मुदत देणेत येऊन सदर रक्कमांचे हप्ते करुन द्यावे जेणेकरुन

वीज वितरण कंपनीस देखिल काही तोटा न होता ग्राहकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच सध्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे परिक्षेचा काळ सुरु होणार असुन,  10 वी
व 12 वी हा त्यांचे भविष्याचा व महत्वाचा टप्पा आहे सदर परिक्क्षेस विद्यार्थ्यांना होवु नये म्हणुन क ांच्या परिक्षा सुरु होणेपुर्वी आपले कंपनीचे ज े काही कामे असतील ते करुन घेणेत यावे, जेणे करुन विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार नाही. सदरील बाबीबाबत आपले स्तरावरुन योग्यती पुढील कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आले.
निवेदनावर प्रविण नाईक
सहसंपर्क प्रमुख,
सुनील पाटील जिल्हा समन्वयक,
गणेश जगन्नाथ धात्रक जिल्हा प्रमुख,
संजय कटारीया जिल्हा संघटक,
संतोष गुप्ता तालुका प्रमुख,
संतोष बळीद जिल्हा उपप्रमुख,
माधव शेलार मनमाड शहर प्रमुख,विलास कटारे, संतोष सांगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी लियाकत शेख,विजू मिश्रा,युवा सेनेचे सनी फसाटे, इरफान शेख आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.