loader image
[ays_poll id=7]

वीर भगवान एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Mar 11, 2024



नांदगाव तालुका तसेच विधानसभा मतदारसंघातील विविध गावात भगवान विर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सौ. अंजुमताई कांदे यांनी विविध गावांमध्ये जयंती उत्सवास उपस्थिती लावली.
       आज महाशिवरात्री, जागतिक महिला दिन,आणि वीर एकलव्य महाराज यांची जयंती असा सुवर्णं योग जुळून आला आणि त्या निमित्ताने आज पुन्हा तुमच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली. हे आमचे भाग्य आहे.  असे मनोगत सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी मनोगत व्यक्त केले.
    सोयगाव,हिसवळ खुर्द, चोंढी जळगाव, सावकारवाडी,वऱ्हाणे, येथे वीर एकलव्य महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बोलताना सौ.कांदे यांनी आमदार सुहास कांदे यांनी मतदार संघात केलेल्या कामांचा उल्लेख आपल्या भाषणातून केला.त्यात करंजवन पाणी योजना,७८ खेडी पाणी योजना,मनमाड औद्योगिक वसाहत,नांदगाव स्वतंत्र पाणी पुरवठा योजना,आणि भविष्यात महिलांसाठी घरपोह्च उद्योग आणि शेती सिंचनासाठी शाश्वत पाणीपुरवठा,यासह नागरिकांना सध्या ज्या आरोग्य,शिधापत्रिका, शासकीय कागदपत्रे,अशा मूलभूत गरजा ही आमदार सुहास अण्णा पूर्ण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
      यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.विद्या जगताप,सौ.संगीता बागुल, रोहिणी मोरे, सौ.मायाताई खाडे, धनंजय कांदे,मनमाड बाजार समितीचे माजी सभापती अंकुश कातकडे, नागापूर चे सरपंच राजेंद्र पवार,शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष महेंद्रनाना दुकले,उपसरंपच संजय आहेर,कैलास फुलमाळी,सरपंच समाधान व्हडगळ,संतोष सोनावणे,पोपट आहेर,संदीप आहेर,विजय आहेर,गंगाराम पवार,सुमन खुरसने,नंदा सोनावणे,रेखा वाघ,आशाबाई आहिरे,सरपंच भरत पवार, आदिंसह शेकडो ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.