loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मोबाईल दुकानला आग लाखो रुपयांचे नुकसान

Mar 30, 2024


बोलठाण प्रतिनिधी , दि. २९…
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील हरिओम मोबाईल शॉप या दुकाकास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील उमेश लालचंद दायमा यांच्या बस स्थानक परिसरात असलेल्या हरिओम मोबाईल शॉप या दुकाकास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास येथील काही तरुण व नागरिक मॉर्निंग वॉक साठी जात असतांना त्यांना वरील दुकानातून धुर निघत असल्याचे दिसून आले असता त्यांनी दुकानाचे संचालक उमेश दायमा आणि त्यांचे बंधू पत्रकार निलेश दायमा यांच्याशी संपर्क करुन परिस्थिती बाबत माहिती दिली.
दायमा बंधू यांनी दुकानचे शटर उघडून नागरिकांच्या सहकार्याने आग विझवून आतील सामान बाहेर काढले. यामध्ये मोबाईल रिपेअरींग साठी लागणारे साहित्य चार लाख, बेसीक फोन ५० नग पन्नास हजार, जुने मोबाईल एक लाख दहा हजार रुपये, लॅपटॉप आणि इतर मिशनरी दिड लाख, दुकानचे फर्निचर एक लाख रुपये असे आठ लाख दहा हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे येथील तलाठी जयेश मलधोडे यांनी पंचांसमक्ष केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे.
दुकानला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नसून वरील घटने बाबत वाच्यता होताच बोलठाण तसेच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.