मनमाड – चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असता गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर या शेतक-यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यानंतर अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सरपंच अश्विनीताई खैरनार यांचा सत्कार
मल्हारवाडी ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित सरपंच सौ.अश्विनीताई खैरनार यांचे शाल श्रीफळ व...









