नांदगांव : मारुती जगधने
इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन अधिक काळ चाललेले जुने कायदे आता इतिहास जमा झाले असून नविन कायद्या नुसार आयपिसी एैवजी बीच एन एस असा उल्लेख पोलिस डायरीत होईल शिवाय नवीन कायद्याची जरब गुन्हेगाराना बसनार आहे .या नविन कायद्याची अंमल बजावणी दि १ जुलै पासून होत आहे . नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी या संदर्भात वकील, पञकार यांना अमंञीत करुन नविन कायद्याची माहिती दिली व जनतेला नविन कायद्याबद्दल अवगत करणे व नविन कायद्याचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन मिडीयाला करण्यात आले .यासाठी
दि २९ जुन रोजी नांदगाव पोलीस स्थानकात एका बैठकीचे आयोजन करुन नवीन कायदा या संदर्भात अवगत केले या वेळी एड सचिन साळवे, पो नि प्रितम चौधरी यानी नविन कायद्या संदर्भात अलर्ट करण्यात आले नविन कायदे काय आहे याची
केंद्रिय ग्रहमंञालयाने अंमल बजावनी दि १ जुलै पासून होत आहे या साठी होणार्या घडामोडी ,नागरिकाच्या तक्रारी बद्दल नविन कायद्याची उजळणी पोलीसाना करावी लागणार आहे .तसेच प्रत्येक घटनेतील कायदे बिएन एस काय असेल याची आरोपिंना चांगलीच जरब बसेल यातुन गुन्हेगारील आळा बसण्यास मदत नविन कायद्यातुन होईल यासाठी पञकार, पोलीस, वकील ,न्यायधीस आदींना नवीन कायद्याचा अभ्यास करावा लागेल.शिवाय वेळो- वेळी नविन कायद्याच्या पुस्तकाची पाने चाळावी लागतील. नांदगांव पोलीस स्टेशनच्या वतीने नविन कायद्याची जानीव करुन देत प्रचार प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले .