महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या रॅलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. हर घर तिरंगा’ अभियानात, 9 ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ च्या दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, सहकारी संस्था, आणि शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने केली जाणे अपेक्षित आहे. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. भारतीच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ रॅलीच्या माध्यमातून लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला व स्वतःमध्ये तसेच आपल्या युवा पिढीमध्ये देश प्रेम, सांस्कृतिक मूल्ये यांना वाव मिळावे असा हेतू होता. या रॅलीचे शुभारंभ उपप्राचार्य डॉ बी एस देसले, पर्यवेक्षक डी व्ही सोनवणे, कुलसचिव समाधान केदारे,लेफ्टनंट प्रा प्रकाश बर्डे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ पवनसिंग परदेशी, प्रा.सोमनाथ पावडे, प्रा. कविता काखंडकी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ही रॅली मनमाड शहरातील महाविद्यालय- विवेकानंद नगर- जय भोलेनाथ मंदिर परिसर- गणपती मंदिर परिसर या भागात आयोजित करण्यात आली. या रॅलीचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS )व राष्ट्रीय छात्र सेना(NCC) यांच्या माध्यमातून करण्यात आले.













