प्राचार्य डॉ. सुभाष निकम
मनमाड: शिक्षण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून तो राष्ट्रीय कार्यक्रमाचा कणा आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये अध्यापनाबरोबर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. या प्रक्रियेत शिक्षक, विद्यार्थी याबरोबरच पालक हा घटक देखील महत्त्वाचा आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे पालकांनी संपत्ती कमावण्यापेक्षा आपल्या पाल्याला संपत्ती कमावण्यायोग्य बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी केले
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे शिक्षक पालक सभा आयोजित केली होती याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर पालक प्रतिनिधी म्हणून श्री विद्याधर वाघ, श्री गोरखनाथ अहिरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, शिक्षक पालक सभेचे चेअरमन श्री एस. डी. देसले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल सातपुते, प्रास्ताविक पी. व्ही. अहिरे व आभार श्री एस. डी. देसले यांनी व्यक्त केले.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....