नांदगाव – मारूती जगधने शहरालगत असलेल्या कोल्ह्या नाल्याव
रील नांदगांव मनमाड मालेगाव रोड वरील जुना जोड पूल अपुऱ्या क्षमतेचा असल्याने गिरणा नगर हाद्दीतील पुलाच्या मागणीस जोर वाढला होता. आता अखेर नवीन भक्कम जोड पुलाचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले असून, हे काम स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
विशेष म्हणजे हाजोड पुल १५ पिलर च्या भककम बांधणी करून सिमेंट काँक्रिटचा पाया, मजबुतीकरणासाठी लोखंडी जाळ्यांची रचना, व पिलर उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल अधिक भूकंपरोधक आणि दीर्घकालीन टिकाऊ राहील, याची दक्षता घेतली जात आहे.
या नव्या पुलामुळे वाहतुकीचा अडथळा दूर होणार असून, शालेय विद्यार्थी, शेतकरी, आणि दैनंदिन प्रवासी यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हनुमान नगर च्या वळणावर अनिक समस्या ” निर्माण होत असे पण जुना पुलाची भिंत मात्र अत्यंत साध्या पद्धतीत दिसून आली कारण जोडपुलाचे काम करतांना जुन्या पुलाची शितीचा पाया नसल्यान चे दिसून आले आमदार निवास सावरकर वसाहत हनुमान नगर शहा दू नगर जाण्यासाठी या जोड पुलाचा लाभ वाहतुकी ला होईल
नवीन पुलामुळे या वाहतुकअडचणीला पूर्णविराम मिळणार आहे.
स्थानिक आमदार सुहास कांदे या नी कामाची नुकतीच पाहणी केली असून, जुलै ऑगस्ट २०२५ पर्यंत पूल पूर्ण होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. अनुभवी ठेकेराराने हे कांम हाती घेतले आहे
महत्त्वाचे मुद्दे:
पुलाचे काम २४ तास सुरु
स्थानिक लोकांची पाठिंबा व आनंद
पूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होणार सदर जोड पुल पूर्ण झाल्या वर हनुमान नगर व नांदगांव शहराचा नविन लुक बघायला मिळेल