loader image

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

Jul 12, 2025


नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागण

मारुती जगधने ,नांदगाव आणि मनमाड शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असल्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहतूक दाटीमुळे अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वळण रस्ता (बायपास रस्ता) तातडीने तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

याच मुद्द्यावर आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्ष वेधून घेतले. त्यांनी सरकारचे लक्ष वेधत स्पष्ट केले की, “नांदगाव आणि मनमाड या दोन्ही शहरांतून वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, व्यापारी वर्ग, व सामान्य नागरिक यांना याचा मोठा त्रास होत असून अपघातांमध्ये वाढ झालेली आहे.”

 

वळण रस्त्यामुळे होणारे फायदे:

 

शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल

अपघातांचे प्रमाण कमी होईल

इंधन आणि वेळेची बचत होईल

नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता वाढेल

व्यापारी व प्रवासी वाहनांना सुलभ मार्ग मिळेल

आमदार कांदे यांनी सरकारकडे या दोन्ही शहरांना वळण रस्त्याची तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे आणि या कामासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

 

स्थानिक नागरिकांनी देखील या मागणीचे स्वागत केले असून, “शहरात प्रचंड गर्दी होते, बायपास रस्ता झाला तर खूपच दिलासा मिळेल,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.