दिवाळी भारतातील सर्व धर्मियांचा सर्वोच्च सण आहे. रोषणाई,उल्हास,प्रेम,मैत्री,व मानवतेने भरलेला तेजोमय उत्सव म्हणजे दीपावली.
हा सण व उत्सव साजरा करताना आपण आपले घर नक्कीच प्रकाशमय करा पण आपल्या सभोवती बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरिबां विषयी मानवी संवेदना जागृत नक्की ठेवा.
दीपावली साठी आपण ऑनलाईन व मोठमोठ्या मॉल ,दुकानांमधून वस्तूंची खरेदी करतो, पण त्याच दुकानाबाहेर रस्त्यावर, फुटपाथवर काही छोटे दुकानदार, गरीब मुलं, पुरुष व स्रिया दिवाळीचे साहित्य विकताना आपण बघतो. कारण नसतांनाही आपण काही साहित्य यांकडून विकत नक्की घ्या. कारण तुमच्या काही पैशांनी त्यांच्याही घरी दिवाळी साजरी होईल. हे रस्त्यावरील छोटे विक्रेते श्रीमंत होण्यासाठी नाही,तर जगण्यासाठी धडपड करत असतात.
परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या या गरिबांप्रति मानवी संवेदना जागृत ठेवणे हीच खरी दिवाळी व हेच खरे लक्ष्मी पूजन ,आणि याच खऱ्या दीपावली च्या मंगलमय संवेदनशील शुभेच्छा असतील.
रंगीत खडू माध्यमातील हे संवेदनशील फलक रेखाटन नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.या शाळेचे कला शिक्षक श्री.देव हिरे.यांनी फलकावर रेखाटले आहे. या फलक रेखाटनातून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक संवेदनात्मक शुभेच्छा !