loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Jan 12, 2026


मनमाड येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.इं दोर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री.विवेक देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांनी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, हिंदवी स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना केवळ युद्धकलाच शिकवली नाही, तर न्याय, नीती आणि स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली. एवढेच नव्हे तर शिवराय मोहिमेवर असताना स्वराज्याचा कारभार अतिशय कुशलतेने पाहणाऱ्या त्या एक आदर्श प्रशासक होत्या. आजच्या काळात जिजाऊंचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. “प्रत्येक घरात एक जिजाऊ जन्माला आली, तरच प्रत्येक घरात एक शिवाजी घडेल.” आजच्या स्त्रियांनी जिजाऊंचा स्वाभिमान आणि धडाडी अंगी बाळगणे आवश्यक आहे.

भारत हा युवकांचा देश आहे. भारतीय संस्कृती जगात पोहचविणारे स्वामी विवेकानंद हे आजच्या युवकांचे आदर्श असले पाहिजे. त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृती आणि वेदांची खरी ओळख करून दिली. त्यांनी केवळ धर्मावरच नव्हे, तर मानवाच्या उद्धारावर अधिक भर दिला.त्यांच्या मते, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणसाच्या चारित्र्याचा विकास होय. तुम्हाला जर स्वतःवर विश्वास नसेल, तर तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही, असे त्यांचे मत होते.आत्मविश्वास हाच यशाचा खरा मार्ग आहे. आजच्या काळात जेव्हा आपण छोट्या संकटांनी खचून जातो, तेव्हा त्यांचे विचार आपल्याला बळ देतात. “शंभर वेळा अपयश आले तरी पुन्हा एकदा प्रयत्न करा,” हा त्यांचा सल्ला आजही तितकाच लागू होतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.आर.पावडे यांनी केले. कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी.व्ही सोनवणे, प्रा. एस.जी.सुखदेवे, डॉ. संजय चिंचोले, महाविद्यालायचे कुलसचिव समाधान केदारे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.शरद वाघ यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.