loader image
[ays_poll id=7]

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

Jul 14, 2026


 

कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत ‘रॉयल रायडर्स’*व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या सोबतीने नाशिक ते पंढरपूर अशी ३८० किलोमीटरची *सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

दिवस पहिला: नाशिक ते अहिल्यानगर – भक्तीला पंख
वारीला १० जुलै रोजी सकाळी ५:३० वाजता नाशिक येथे‘फ्लॅग ऑफ’ करण्यात आला. पहिल्याच दिवशी सिन्नर घाट हे मोठे आव्हान होते. जिद्दीच्या बळावर घाट पार करत वारीत सहभागी झालेले सर्व सायकलस्वार सिन्नर येथे पोह्यांचा नाश्ता आणि नादुर शिंगोटे येथील हायड्रेशन पॉईंटवर घेतलेल्या अल्प विश्रांतीनंतर पुढे रवाना झाले.
राहुरी येथे दुपारचे जेवण घेतल्यानंतर राहुरी ते अहिल्यानगर हा खडबडीत रस्त्यामुळे सर्वात कठीण टप्पा पार करून सायंकाळी अहिल्यानगर येथे मुक्काम करण्यात आला. घाट चढून विठ्ठलाची मूर्ती दिसताच सर्वांचा थकवा क्षणार्धात नाहीसा झाला.

दिवस दुसरा: अहिल्यानगर ते टेंभुर्णी – जिद्दीची परीक्षा
११ जुलै रोजी पहाटे अहिल्यानगरहून निघालेल्या वारीने तब्बल १६० किलोमीटरचा प्रवास करत टेंभुर्णी येथे मुक्काम केला. ज्ञानबा-तुकाराम आणि विठ्ठल-विठ्ठल च्या जयघोषात आणि रस्त्यात भेटणाऱ्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने हा कठीण टप्पा सहज पार पडला.

दिवस तिसरा: टेंभुर्णी ते पंढरपूर – ध्येयपूर्ती
१२ जुलै रोजी सकाळी टेंभुर्णीहून निघून पंढरपूर येथे पोहोचताच श्री विठ्ठलाच्या चरणी लीन होताच ३ दिवसांचा सर्व थकवा नाहीसा झाला. महाराष्ट्रातून आलेल्या सायकल वारकऱ्यांचे भव्यदिव्य सायकल रिंगण बघून डोळ्याचे पारणे फिटले विठूच्या दर्शनाने सर्व सायकलस्वार धन्य झाले.

३ दिवस, ३८० किमी, एकच ध्यास – पंढरी
या वारीत छत्रे विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रवीण व्यवहारे सिद्धी क्लासेस चे संचालक डॉ.भागवत दराडे, युवा उद्योजक गणेश वाहले, सौ.संगीता कदम, सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ.योगेश मगर,सुप्रसिद्ध डॉ.निलेश हारदे या मनमाडच्या सायकलिस्ट ने ही खडतर मोहीम केवळ जिद्दीच्या जोरावर पार पाडली

वारीनंतर भावना व्यक्त करताना सहभागी म्हणाले, “वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर तो अंतर्मनाचा प्रवास आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची भक्ती पाहून आम्हाला खरी प्रेरणा मिळाली. विठ्ठलाच्या ओढीमुळे कठीण वाटलेला प्रवासही आनंददायी झाला.”

ही वारी केवळ एक सायकल वारी मोहीम नसून, शिस्त, आरोग्य आणि भक्ती यांचा मिलाफ असलेली ‘आनंदवारी’ ठरली.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.