
स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या कारभारावर संताप
मनमाड | प्रतिनिधी
मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनमाड शहर शाखेने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सर्वपक्षीय व सर्वसामान्य वीज ग्राहकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.











