loader image
[ays_poll id=7]

दुष्काळ आणि महागाईच्या चक्रात अडकला “बैलपोळा”

Sep 9, 2026


आधीच पावसाने घेतलेली विश्रांती आणि सर्जा-राजाच्या सजावटीच्या साहित्याच्या दरात झालेली वाढ यामुळे सर्जा-राजाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा साजरा कसा करावा? असा प्रश्न परिसरातील शेतकरी राजाला पडला आहे.
पावसाने गेल्या सव्वा महिन्यापासून ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अशा स्थितीत एकीकडे पिके वाचविण्याची चिंता सतावत असतानाच बैलपोळ्याच्या तोंडावर सर्जा-राजाच्या साजशृंगाराच्या साहित्य दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
शेतमालाचे घसरलेले दर, वाढती महागाई आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे यंदा बैलपोळ्याची खरेदी अत्यंत हात राखून केली जात आहे. परिणामी, दरवर्षी गजबजणाऱ्या बाजारपेठेत यंदा शुकशुकाट असून, व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड :- मराठा आरक्षणासाठी  राज्य शासनाने  काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या...

read more
नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या...

read more
माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी किलकारी या फिरत्या आरोग्य (एम-हेल्थ)...

read more
.