
राज्यातील काही शेतजमिनींवर परस्पर कुळ लावण्यात आले असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याची गंभीर दखल महसूलमंत्र्यांनी घेतली असून, आतापर्यंत कुळकायद्याखाली मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कलम 155 अधिकाराच्या गैरवापरानंतर आता कुळकायद्याचा गैरवापर झाला असल्याचे यावरून बोलले जात आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी राज्यातील सर्व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी या संदर्भातील आदेश दिले असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. काही जमिनींना परस्पर कुळ लावण्यात आले असल्याच्या तक्रारी महसूलमंत्र्यांपर्यंत गेल्या होत्या. त्यावरून त्यांनी ही बैठक घेतली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.










