रेल्वे तर्फे नुकतीच उधना नंदुरबार पुणे या अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु सदर गाडीला नांदगावला थांबा नसल्याने सदर गाडीला नांदगावला देखील थांबा देण्यात यावा यासाठी नांदगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी दिली आहे. नांदगाव येथून पुणे येथे जाण्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त आणि सोयीची ठरणार असल्याने नांदगाव स्थानकावर देखील गाडीला थांबा मिळणे गरजेचे असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...











