loader image
[ays_poll id=7]

गिरीष दारुंटे यांना राज्यस्तरीय “शिक्षकरत्न” पुरस्कार जाहीर…

Sep 11, 2021


मनमाड : व्ही. एन. नाईक माध्यमिक विद्यालय, मनमाड येथील तंत्रस्नेही शिक्षक श्री. गिरीष वाल्मिक दारुंटे यांना ५ सप्टेंबर शिक्षक दिनी शैक्षणिक दीपस्तंभ संस्थेच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “शिक्षकरत्न २०२१” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शैक्षणिक दीपस्तंभ तर्फे शिक्षक दिनी महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, प्राध्यापक व साधनव्यक्ती यांचे प्रस्ताव मागितले होते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून १८० शिक्षकांनी आपले प्रस्ताव सादर केले. सादर केलेले सर्व प्रस्ताव अतिशय दर्जेदार व शिक्षकांच्या कार्याचे प्रतिबिंब दर्शविणारे होते.

गिरीष दारुंटे हे स्वनिर्मित शैक्षणिक pdf व flipbook उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक विषयांवर व वर्षभरात साजऱ्या केल्या जाणारे विविध राष्ट्रीय कार्यक्रम, जयंती / पुण्यतिथी, दिनविशेष इ. सारख्या कार्यक्रमांसाठी आवश्यक सुत्रसंचलन व इतर माहितीचे WhatsApp, युट्युब चॅनल व “ज्ञानज्योती सावित्रीबाई शैक्षणिक ब्लॉग” च्या माध्यमातून राज्यभर पोहचविण्याचे काम निरपेक्षपणे व सहकार्य भावना जोपासत निरंतर करीत असतात.

तसेच त्यांच्या “ज्ञानज्योती सावित्रीबाई शैक्षणिक ब्लॉगला” आजवर जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त भेटी देवून राज्यातील शिक्षकांनी त्यातील माहितीचा लाभ घेतलेला आहे.

शैक्षणिक कार्याची दखल घेत गिरीष दारुंटे यांना आजवर गुरुगौरव, कलागौरव, कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार, गुणगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय शंभू पुरस्कार, राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जगन्नाथरावजी धात्रक, नगराध्यक्षा सौ. पद्मावतीताई धात्रक, मा. नगराध्यक्ष गणेशभाऊ धात्रक, सनी फसाटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. दरगुडे सर व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या सहा विकास कामांच्या षटकार व्हिडिओचे सोशल मीडियावर जनतेतून स्वागत

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या सहा विकास कामांच्या षटकार व्हिडिओचे सोशल मीडियावर जनतेतून स्वागत

नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदारसंघात आतापर्यंतच्या कार्यकाळात...

read more
मार्च एंड आणि २८ एप्रिल पर्यंत गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत – बाजार पेठेत शुकशुकाट

मार्च एंड आणि २८ एप्रिल पर्यंत गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत – बाजार पेठेत शुकशुकाट

गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लग्नसराईला १९ मार्चपासून विवाह मुहूर्त नसल्याने, तसेच...

read more
राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२३ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी सेविका कल्पना ताई जाधव.पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.

राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२३ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी सेविका कल्पना ताई जाधव.पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.

दिनांक २० मार्च ते ०३ एप्रिल २०२३सर्वत्र पोषण पंधरवडा साजरा केला जातो आहे..याकालावधीत एकात्मिक बाल...

read more
.