काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नाना पटोले यांनी शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा पवारांच्या विधानावर असहमती दर्शवत प्रतिक्रिया देत ” भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत विचारावर चालणारे लोक आहेत, अशा लोकांनी काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा एकत्र यावे, काँग्रेसच्या झेंड्याखाली बरोबर एकत्र यावे. पवारांच्या वक्तव्याचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधी पक्षांनी या वक्तव्याचा कितीही लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी, काँग्रेस पक्षाचे काहीच नुकसान होणार नाही” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.दरम्यान, काँग्रेस हा एक विचार आहे. काँग्रेसच्या विचारला कठीण दिवस आले आहेत. कारण धार्मिक भेदाभेद करणारे वाढले आहेत. भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्वे मानणारे आपण एका विचाराचे आहोत. आपण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असेही थोरात पुढे म्हणाले.
जयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक
चंदीगड येथे २६ ते २जयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक चंदीगड येथे २६ ते...











