loader image
[ays_poll id=7]

ओबीसी आरक्षणाशिवाय होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका – चुरस वाढणार !

Sep 14, 2021


राज्यात आगामी निवडणुकांसाठी सध्या जोरदार तयारी पाहायला मिळते. याच पार्श्‍वभूमीवर पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवरील निवडणुका होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाला असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. त्यामुळे लवकरच या पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक माहितीनुसार, नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लवकरच याचा तारखाही जाहीर होतील अशीही माहिती आहे. इतकंच नाहीतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय झाला तर राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर असताना आता निवडणुकांमध्येही जर आरक्षणाचा फायदा होणार नसेल तर यामुळे राज्यात एकच राजकीय रंग पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

खरंतर, सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ ला दिलेल्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण हे संपुष्टात आले होते. त्यामुळे अशाच आता न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पोटनिवडणुकांचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळेल. त्याच पार्श्वभूमीवर येत्या तीन-चार दिवसात कार्यक्रम जाहीर करण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.


अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे थायलंड येथे होणाऱ्या ‘भारत संस्कृत यात्रा’ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे थायलंड येथे होणाऱ्या ‘भारत संस्कृत यात्रा’ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार….

योगेश म्हस्के मनमाड : मनमाड शहराचे भुमीपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे...

read more
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून...

read more
सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेन वर या...

read more
.