loader image
[ays_poll id=7]

आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार: हायकोर्ट!

Sep 16, 2021


समाज माध्यमांवर एखाद्या धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यानंतर ते संदेश डीलिट करणे हा एकप्रकारे पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार असून अशा स्वरूपाचा गुन्हा रद्द करता येत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले.

जफर अली शेर अली सैय्यद (वय ५८) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. आरोपी कन्हान येथील रहिवासी असून ऑक्टोबर २०१९मध्ये कन्हान येथे दुर्गा उत्सवादरम्यान परिसरातील लोकांचा व्हॉट्सअॅप समूह तयार करण्यात आला होता. त्या समूहावर जफर अलीने धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे समूहातील दुसरे सदस्य मनीष सिंह यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच जफर अली हा पळून गेला व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर तो पोलिसांसमोर हजर झाला असता त्याने आपल्या भ्रमणध्वनीतून तो संदेश नष्ट केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर धार्मिक भावना भडकवणारे, समाजात तेढ निर्माण करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. तसेच तसे संदेश नष्ट करणे हा एकप्रकारे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार असून यासंदर्भात पोलिसांनी तपास करून खटला चालवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची आरोपी जफर अलीची विनंती फेटाळली.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान

शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान

  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी...

read more
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...

read more
तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

  सौ.अंजुमताई कांदे यांची "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानांतर्गत जि.प.साकोरा शाळेस...

read more
.