देशात कोरोना रुग्णांची आश्यर्चकारक वाढत असलेली संख्या आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येत असलेल्या सण-उत्सवांच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना पुन्हा एकदा सावधानी बाळगण्याचे आवाहन केले आहे. केरळ
राज्यात रुग्णांची संख्या कमी होत असली तरी देशातील रोजच्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा केरळ राज्याशी निगडीत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार केरळमध्ये १.९९ लाख पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असुन पाच राज्यांमध्ये मिजोरम, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु आणि महाराष्ट्रात १0000 पेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
सण-उत्सवानिमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने या काळात जर नागरिकांनी काळजी न घेतल्यास हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण दिल्यासारखेच असेल, असे तज्ञांचे मत आहे. तरी नागरिकांनी सर्वोतोपरी काळजी घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवावे व लसीकरण करुन घ्यावे, अशा सुचना आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आल्या आहेत.










