loader image
[ays_poll id=7]

गुलाब चक्रीवादळ – दोन दिवस महाराष्ट्रात अलर्ट !

Sep 27, 2021


पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘गुलाब’ नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा ओडिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांना बसत आहे. आंध्रप्रदेशमध्ये या चक्रीवादळामुळे 3 मच्छिमारांचा मृत्यू झाला. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये 27 आणि 28 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, धुळे, जळगाव, नाशिक, यासह बर्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे रेंड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.या चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.