loader image
[ays_poll id=7]

३० वर्षे सत्ता असूनही मुंबईत मराठी परकीच – आमदार अमित साटम!

Oct 1, 2021


मुंबई कोणाची ? मराठी माणसाची…एकेकाळी स्व.बाळासाहेबांनी मराठी मुंबईची केलेली ओळख…आणि मुंबई कायम राजकीय पटलावर चर्चेत राहिलेले विषय. सध्या मुंबई विविध प्रकरण गाजत असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला धारेवर धरले आहे. गुरुवारी भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्र लिहल्यानंतर आज भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात मुंबईत मराठी भाषेवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली आहे.

मुंबईत ३० वर्षे शिवसेनेची सत्ता असून देखील मुंबईत मराठी भाषेची अवस्था अतिशय बिकट असल्याचे साटम यांनी म्हटले आहे. शिवसेनेकडून मराठी भाषेच्या विस्तारासाठी प्रयत्न होत नसल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साटम यांनी पत्र पाठवले असून त्यामध्ये त्यांनी मराठी भाषा व मराठी शालांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
 
मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला, तशीच अवस्था मराठी शाळांची आणि भाषेची झाली आहे. सण 2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० इतकी राहिल्याचे साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.