loader image
[ays_poll id=7]

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

Oct 7, 2021


अंकाई ता येवला येथील अंकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता.त्यामुळे भगतवाडी येथे राहणारे ५० ते ६० कुटुंबाचा गावाशी संपर्कच तुटला होता,तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य श्री अलकेश कासलीवाल यांच्याशी संपर्क साधून व्यथा सांगीतली,त्यांना शेतीमाल वाहतूक करणे मजूर ने आण करणे ,दुग्धव्यवसाय सगळंच ठप्प झालं होतं,
सदर रस्त्यावर खर्च करणे ग्रामपंचायत ला शक्य नव्हतं,,जिल्हा परिषद तातडीने काम करणार नाही म्हणून अंकाईचे सरपंच सौ नागिना कासलीवाल, उपसरपंच शिवम अहिरे,सदस्य डॉ प्रितम वैद्य,अलकेश कासलीवाल,सागर सोनवणे व संतोष टिटवे यांनी स्वखर्चाने जेसिबी दिला व तेथील ग्रामस्थ दत्तू सोनवणे,भगवान जाधव,विलास जाधव,बाळू सोनवणे,पारुबा राऊत,सागर देवकर,बाळू जाधव,नंदू जाधव,नितीन देवकर,रवींद्र जाधव,आदींनी आपला ट्रॅक्टर देऊन शाम व्यापरे, किरण बडे, मारुती वैद्य,भगवान जाधव,किरण देवकर,अण्णा जाधव,शांताराम वैद्य,सचिन जाधव,शंकर चव्हाण व सर्व तरुणांनी मिळून रस्त्याचे काम पूर्ण करून प्रशासनाचे लाखो रुपये वाचवले व स्वतःच्या समस्या वर स्वतःच मार्ग काढत सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे,येवला तहसीलदार प्रमोदजी हिले,भुजबळ साहेबांचे स्वीय सहायक लोखंडे साहेब,बीडीओ उन्मेष देशमुख,सभापती प्रविणजी गायकवाड आदींनी सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थांचे कौतुक करत अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये...

read more
नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव : मारुती जगधने जेव्हा पडायचा तेव्हा नाही आला आता प्रचंड नासाडी करुन होते नव्हते ते चिंब...

read more
अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

नांदगाव : मारुती जगधने लग्नाचे वय झाले नसताना सुद्धा अल्पवयीन मुलींचे लग्न लाऊन दिले त्यांना मुले...

read more
.