बऱ्याच वेळा रस्त्याने प्रवास करत असताना रस्त्यावरील जनावरांमुळे अडथळा निर्माण होतो. भर रस्त्यात जनावरे बांधून अडथळा निर्माण करणाऱ्याना आता सावध व्हावे लागेल कारण रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्याना आता ग्रामपंचायत नोटीस बजाऊ शकते. नोटीसची दखल न घेतल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, असे आदेश शासनाने दिले आहेत.
राज्य शासन कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते निर्मिती करतात मात्र काही लोक त्याच रस्त्यांवर आपली पाळीव जनावरे बांधून रस्त्यात अडथळे निर्माण करतात, हि समस्या कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.












