loader image
[ays_poll id=7]

भारत-पाक सामना होणारच – BCCI !

Oct 20, 2021


संपूर्ण देशभरातून विरोध होत असलेल्या  टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामना नियोजित तारखेलाच होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी-20 विश्वचषक ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार युएईत सुरु झाला आहे तर भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होत आहे. परंतु या सामन्यावर बंदीचं सावट होतं. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच  वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांसह विविध संघटनांनी केली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तान सामना होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने सर्व पाच सामने जिंकले आहेत.


अजून बातम्या वाचा..

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार...

read more
परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-16 नाशिक जिल्हा संघाच्या निवड चाचणी...

read more
.