loader image
[ays_poll id=7]

एका दिवसात 340 नागरिकांचे झाले लसीकरण !

Oct 24, 2021


मनमाड मधील दिवंगत जेष्ठ समाजसेवक कै.पन्नालालजी शिंगी आणि कै.किशोरजी नावरकर यांच्या स्मरणार्थ रा. स्व. संघ जनकल्याण समिती, एसएनजेबी संस्थेचे श्रीमती के.बी.आब्बड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व श्री. आर.पी. चोरडिया हॉस्पिटल चांदवड, रसिकलाल धारिवाल हॅास्पिटल नाशिक आणि संस्कृती संवर्धन समिती यांच्या वतीने उद्योगपती अजित सुराणा, डाॅ. सुनिल बागरेचा, डाॅ.प्रताप गुजराथी आणि डाॅ.रविंद्र राजपूत यांच्या सौजन्याने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ३४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 

सदर शिबिरास नवीन शिंगी, सुभाष संकलेचा, मनोज बाफना यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या. संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष सतीश न्हायदे, संस्कृती संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण व्यवहारे, रत्नाकर घोंगडे, योगेश म्हस्के, सिद्धांत लोढा, सोमेश राजनोर, गोकुळ परदेशी, प्रमोद मुळे, गाडगीळ सर, डॉ दराडे तसेच रा स्व संघ जनकल्याण समितीचे विवेक हातेकर, रमाकांत मंत्री, प्रकाश कुलकर्णी आदीनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

रमाकांत मंत्री, डॉ.सुनील बागरेचा, डॉ.राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवीण व्यवहारे, सतीश न्हायदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जनकल्याण समितीचे निमंत्रक विवेक हातेकर यांनी शिबीर आयोजन केल्याबद्दल संस्थांचे आभार व्यक्त केले. रसिकलाल धाड़ीवाल हॉस्पिटलचे डॉ.विजय गावित, एस एन जे बी संस्थेचे डॉ.जांगडा, डॉ.कबाड़े व सर्व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

कै.डॉ.सी.एच.बागरेचा यांना स्मृती दिनानिमित्त सामूहिक आदरांजली वाहण्यात आली आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
.