लसीच्या अँलर्जी किंवा दुष्परिणामांच्या भीतीने जीव जाण्याची किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता असलेले किंवा कोरोना आजारातून बरे झालेल्यांनी कोरोना लस घेऊ नये असे अनेक तज्ञ डॉक्टरांनी व चे संचालक डॉ. संजीव राय यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. परंतू तरीसुद्धा AIIMS काही अधिकाऱ्यांकडून लस कंपन्यांना हजारो कोटींचा गैरफायदा पोहचविण्यासाठी सरसकट सर्वांना लस घेण्याची सक्ती केली जात होती व लस न घेतलेल्यांना मुंबईतील लोकल मधून प्रवासास बंदी, मॉलमध्ये प्रवेश बंदी इत्यादी तुघलकी आदेश काही अधिकाऱ्यांनी काढले होते.
त्या गैरकायदेशीरपणांविरुद्ध ‘अव्हेकन इंडिया मुव्हमेंट’ चे श्री. योहान टेंगरा, श्री. अंबर कोरी व श्री. फिरोज मिठीबोरवाला आदी लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध भा.द.वि. १६६,१८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा चे कलम ५१ (ब), ५५ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.
ती याचिका उच्च न्यायालयाचे आदेशानुसार जनहित याचिकेमध्ये परावर्तीत करण्यात आली.
त्याशिवाय ‘अव्हेकन इंडिया मुव्हमेंट’ व ‘इंडियन बार असोसिएशन’ तर्फे आरोपी अधिकारी व मंत्र्याना विविध नोटीसेस पाठविणे, केसेस दाखल करणे इत्यादी स्तरांवर कारवाया सुरूच होत्या.
शेवटी महाराष्ट्र शासनाला शहाणपण सुचून शासनाने दि. रोजीच्या परिपत्रकानुसार असे स्पष्ट केले की, ज्या लोकांना लस घेणे शक्य नसेल त्यांनी आपल्या स्थानिक डॉक्टर्सकडून प्रमाणपत्र बनवून घ्यावे. डॉक्टर्सच्या प्रमाणपत्राचे दोन नमुने खालील लिंकवर उपलब्ध आहे.
Link: https://docs.google.com/document/d/16M4g6xvxyddmrhQo2aPym-FVSFYgMY_e/edit?usp=sharing&ouid=102212062827328232579&rtpof=true&sd=true
Link: https://drive.google.com/file/d/12X9J4NwkwIWgAHBjIEwhYJU4OvQJADQY/view?usp=sharing
शासनाचे परिपत्रक हे खालील लिंकवर उपलब्ध आहे:
Link: https://drive.google.com/file/d/16b_VEA87nQW7-PgQIezipkW9uundb95s/view?usp=drivesdk
सर्व नागरिकांनी आपापल्या डॉक्टरशी संपर्क साधून एक आपले सर्टिफिकेट बनवून घ्यावे, सर्टिफिकेटचे नमुने अवेकन इंडिया च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ते सर्टिफिकेट दाखवून आपण आपल्या डॉक्टरकडून तसे सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता. ज्या नागरिकांना आपला जीव धोक्यात जाण्याची किंवा लसीच्या दुष्परिणामांमुळे लस न घेण्याची कारणे आहेत किंवा ज्या लोकांमध्ये कोरोना होऊन गेल्यामुळे किंवा कोरोनाच्या संपर्कात आल्यामुळे शरीरामध्ये अँटीबॉडीज म्हणजेच शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे अशा लोकांनी खालील दिलेल्या नमुन्यात नमूद कायद्यातील तरतुदीनुसार आपल्या डॉक्टर कडून सर्टिफिकेट बनवून घ्यावेत व आपल्या परिवारातील, आपल्या मित्र परिवारातील लोकांचे रक्षण करावे असे आवाहन इंडियन बार असोसिएशन कडून करण्यात आले आहे.







