loader image

दिवाळीचा आज दुसरा दिवस : धनत्रयोदशी !

Nov 2, 2021


आमच्या समस्त वाचक परिवारास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याची प्रथा आहे.

घरातील दागदागीने तिजोरीतुन बाहेर काढुन ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात. आजच्या दिवशी नव्या कपडयांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजल्या जाते.

धनत्रयोदशी दिवस साजरा करण्यामागे काही कथा सांगितल्या जातात…

ज्यावेळी इंद्रदेवाने असुरासमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातुन देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यानंतर सागरातुन अमृतकुंभ घेउन धन्वंतरी प्रकटले म्हणुन या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पुजा करण्याची पध्दत आहे. या दिवसाला “धन्वंतरी जयंती” असेही म्हंटले जाते.

धन्वंतरी यांना भगवान विष्णुचा अवतार समजल्या जातं. सर्व वेदांमधे ते निष्णात होते, मंत्र तंत्राचे ते उत्तम जाणकार होते त्यांच्या अलौकीक सामथ्र्यामुळे अमृतरूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले आणि म्हणुनच धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हंटल्या जातं. तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दिर्घायुष्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे.

त्याचप्रमाणे हेमराजाचा सुपुत्र वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. या भविष्यवाणीमुळे राजा राणी फार चिंतीत असतात. आपल्या मुलाने आयुष्यात सर्व सुखं उपभोगावीत आणि तो दिर्घायु व्हावा अशी राजा राणीची ईच्छा असते. राजपुत्राचा विवाह करण्यात येतो, भविष्यवाणी प्रमाणे विवाहाच्या चौथ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यु निश्चित असतो. त्या रात्री राजपुत्राची पत्नी त्यास झोपु देत नाही. संपुर्ण शयनगृहात दिवे लावले जातात. राजपुत्राच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या भरपुर मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशव्दार देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांनी पुर्ण भरले जाते.

राजपुत्राची पत्नी त्यास अनेक गोष्टी आणि गाणी सांगत त्याला जागे ठेवते. यमराज ज्यावेळी सापाचे रूप घेउन राजपुत्राच्या खोलीत प्रवेश करतात त्यावेळी या दागदागिन्यांनी आणि दिव्यांनी त्यांचे डोळे दिपतात आणि राजपुत्र त्यांच्या दृष्टीस पडत नाही त्यामुळे ते आपल्या यमलोकात परततात. राजपुत्राचे प्राण वाचतात या दिवसाला यमदीपदान असेही म्हंटले जाते.

धनत्रयोदशीला दिवे लागणीच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावुन त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा यामुळे अपमृत्यु टळतो असा समज आहे. शेतकरी आणि कारागिरी आजच्या दिवशी आपापल्या कामाच्या संबंधीत अवजारांची पुजा करतात. तिफन, नांगर, कुळवाची पुजा केली जाते. शेतकरयांसाठी शेतातुन घरात आलेलं धान्य म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात. धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखविल्या जातो.

सगळीकडे पणत्या लावुन झगमगाट आणि रोषणाई केली जाते. दिपावली हा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे. सर्वजण एकत्र येउन हा पाच दिवसांचा उत्सव मोठया आनंदाने साजरा करतांना दिसतात.


अजून बातम्या वाचा..

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या अखिल...

read more
रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

सेंट्रल रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यास मुख्य इंजीनियर विकाकुमार जैन यांनी भेट दिली असता सेंट्रल...

read more
.