loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
.