loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
महात्मा फुले  अभ्यासीकेचा लाभ घेऊन उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

महात्मा फुले अभ्यासीकेचा लाभ घेऊन उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

▪मनमाड (प्रतिनिधी)- मनमाडसारख्या दूर्लक्षित शहरातून महात्मा फुले अभ्यासिका व वाचनालयासारखे काम उभे...

read more
.