कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या प्रवासासाठी आरक्षित तिकीटाची अट ठेवली आहे मात्र २५ डिसेंबर पासुन मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पंचवटी एक्सप्रेस या गाडीत प्रवास करण्यासाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. त्यासाठी आता ६ डबे अनारक्षित प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. उदरनिर्वाहासाठी दैनंदिन नाशिक व मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...










