ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आयु.रावसाहेब दानवे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना रेल्वे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन मध्ये रेल्वे मध्ये पदोन्नती आरक्षण लागू करण्यात यावे, रेल्वे कर्मचारी व रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी यांना मिळणारा ई-पास बंद करून पुर्वी मिळणारा कागदी पास मिळवा, रेल्वे मध्ये ट्रेंड अॅप्रेटिंस परिक्षा पास झालेले उमेदवारांना रेल्वे मध्ये सामावून घ्यावे, रेल्वेचे खाजगीकरण व उदारीकरण करू नये,रेल्वेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात आणि इतर मागण्या सामाविष्ट होत्या. सदर प्रसंगी असोचे सागर गरुड़,विनोद खरे, प्रेमदीप खडताले उपस्थित होते.
करंजवण पाणी योजनेतील पाणी आरक्षित करण्यासंदर्भात शिवसेनेचे निवेदन
मनमाड करांची जिवनदायी करंजवण पाणी योजना पुर्ण झाल्यानंतरच आवश्यक आरक्षित पाण्यातवाढ केल्यानंतरच...










