आता कृषि आणि कृषीसंलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर शेतकरी आणि शेतमजूर यांनाही नवनवीन तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी सांगितले. कृषि व कृषी संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतानाच वनामती आणि रामेती संस्थांमधून महिला, शेतकरी आणि शेतमजूर यांनाही कृषीविषयक कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी नियोजन आणि धोरण तयार करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी संबधीत विभागाला दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...











