loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू करावी : रिपाईची मागणी

Jan 26, 2022


राज्यराणी , तपोवननंतर आता मनमाड- गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा घाट घातला जात असल्याने मनमाडकरांनी संताप व्यक्त केला आहे . हिंगोलीच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सोयीचे व्हावे , यासाठी मनमाड – मुंबई गोदावरी एक्सप्रेस ही हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे . त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्र लिहिले आहे . सध्या गोदावरी एक्सप्रेस ( गाडी नं .१२११७ आणि १२११८ ) कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून बंद आहे . ती सुरू करण्याची जोरदार मागणी असूनही रल्वे दुर्लक्ष करीत आहे . मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस मुंबईला जाण्यासाठी मनमाडसह , लासलगाव , निफाड व नाशिक जिल्हा व शहरातील नागरिकांसाठी सोयीची गाडी आहे . गोदावरी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत नेऊ नये , अशी मागणी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवासीधारकांची आहे . गोदावरी एक्सप्रेस ही पंचवटीप्रमाणेच मनमाडसह जिल्ह्यातील नागरिकांची सोयीची व आवडीची आहे . राज्यराणी एक्सप्रेस मनमाड – मुंबई अशी होती ती जालन्यापर्यंत नेण्यात आली आता जर गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा प्रयत्न केला तर आरपीआय ( आठवले ) उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेईल , असा इशारा रिपाइंचे नगरसेवक तथा जिल्हाकार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांनी दिला आहे . सदर गाडी ही मनमाड स्थानकातून लवकरात लवकर सूरू करावी , अशी मागणी केली आहे .


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.